Saturday, December 29, 2012

डमरू - पुणे

वाजत गाजत आलेला दमरु पुणेकर रेसिकाना अगदी पर्वणीच ठरला. डमरू प्रत्येक दिवस एक नवीन साज, नवीन स्वर आणि ताल देऊन गेला. डमरू ची बातमी आल्यावरच मी तारखा पाहूनच मनात ठरवल होत की हा कार्यक्रम चूकवायचा नाही आणि मला जायाच ही फार लांब नवत माझया घरातून अगदी 10 मिनिट चालानाच्या अंतरावरच होत. तारखा पहिल्या आणि माझ कॅलंडर मॅच केल ..दुसर काहीही काम, शूट्स त्या वेळेस नवते . दुसर्या दिवशी ऑफीस ला आले तर ऑफीस कडुनच डिसकाउंट पासेस मिळत होते , लगेचच पासेस बुक करून टाकले. डमरू च्या पहिल्या दिवशी कर्ण मधुर तालानी रसिकांना मंत्र मुग्द्ध केल. त्या दिवशी होते –
दिवस पहिला 1.मनी – मृदुंगम 2.सुरेश – घतटां 3.अमृत – खंजिरा 4.अल्लारखा ह्याचे पुत्रा फेज़ल – तबला 5.भवानी शंकर – पखवाज 6.नवीन शर्मा – ढोलकी. पहिल्या दिवशी पारंपारिक संगीता नंतर दुसर्‍यच दिवशी पुणेकर रसिकांना इंडो-वेस्टर्न एकायची संधी मिळाली बोन्डो कडून, बोन्डो हा गोव्याचा असून तो लहान पणा पासूनच हे अश्या प्राकरच म्यूज़िक वाजावतो ..त्याला खूपच कुकीन चा नाद असल्या मुळे किचेन मधल्या प्रत्येक गोष्टीतून कसा आवाज निर्माण होईल आणि त्याचे साचेशीर म्यूज़िक कसे तयार होईल हेच त्याचा डोक्यात नेहेमी असत , खाण्याचा दरडी आणि मुसिक चा छंदी अश्या ह्या बोन्डो ने लोकांना नाचायला भाग पाडले. त्यानंतर तन्वीर सिंग ह्यानी आपल्या अभूतपूर्व तबला वदनाने लोकांना थक्क केल पारंपारिक वाद्यआणि आधुनिक संगीत ह्याची बांधणी त्यानी खूपच छान आणि मधुर केली होती. दिवस दुसरा 1.बांदो – लॅटिन ड्रमिंग आणि फ्यूषन 2.तन्वीर साइन – तबला 3 विक्कू – घात्तम 4.स्वामीनाथन – खंजिरा तिसर्या दिवसाची सुरूवात तोंडाने किती विविध प्रकारचे ताल आणि नाद तयार होऊ शकतात ह्यावर पांडित्य मिळवलेले आणि काचारच्या दब्ब्यातून कसे ताल तयार होतात हे दाखवणारे एकमेव तौफिक खुरेशी आणि त्यांचा मुंबई स्टॅम्प ह्यानी पूर्ण वातावरणात एक वेगळीच गंमत आणली. दब्ब्यातून ते स्वतःच्य श्वासातून कशा ताल निर्मिती होते हे फक्त तोच माणूस करू शकतो. तौफ़ीक नंतर ग्रेग अलिस ह्या संगीत कारने स्वतच्या म्यूज़िक ने सगळ्यावर संगीत मोहिनी घातली. आणि सगळ्यात शेवटी आला तो माणूस ज्याच फक्त नाव एकटच टाळ्यांचा आणि शिट्ट्यांच खच पडतो असा एकमेव शिवमनी .. त्याच्या बद्दल काय सांगावे तेवढ कमीच आहे .. आणि मी आसा वेगळ काय सांगू ..एवढाच सांगते "तो आला ..त्याने वाजवले आणि त्याने मन जिंकली " दिवस तिसरा 1.तौफ़ीक आणि मुंबई स्टॅम्प – ड्रम्स 2.गेर्ग आल्लिसे – ड्रम्स 3.शिवमनी – ड्रम्स पुढच्या वर्षी पण माझ जाण नक्की कारण पुढच्या वर्षी डमरू आपल्याला देणार आहेत असेच टाल आणि नाद पण त्याच बरोबर पुणे कराना हावासा असणारा त्यांचाच एक आवाज महणजे पुण्याचे ढोल-तशा पथक.

Sunday, December 23, 2012

माफ करा माफ करा ..

माफ करा माफ करा .. खुपच बाकीच्या गोष्टींमध्ये व्यस्त असल्या मुळे इथे लिहायला आणि तुमच्याशी संवाद साधायला वेळच मिळाला नाही बाकीच्या म्हणजे ऑफिस च्या कामामुळे अगदी थकून गेलेय .. मला ब्रेक हवं एक छान ब्रेक ..रेफ्रेश करणारा पण आता नवीन वर्षाच्या संकल्पा मध्ये मी रोज नाही पण आठवड्या मध्ये काही काही तरी लिहेन आस काहीस ठरवत आहे असो , बराच काही सांगायचं , बोलायचं .. पण हळू हळू लिहीन आस ठरवलं तरी आहे .. बघू वेळ कशी साथ देते .. उम्म्म्म , कश्या पासून सुरु करू .. दिवाळी ? दिवाळी छान होती .. तेव्हा दिवाळी जाऊदेत .. अर्रे हा एक काम करते लिस्ट बनवते होपफुली मी सगळ लिहू शकेन. मला तुमच्याशी संवाद साधायचं खालील काही गोष्टींवर - १. माझी अष्टविनायक सहल २. ऑफिस च्या हेक्टिक वेळापत्रकामुळे हातातून निघून गेलेल सावाई चे एक पर्व ३. हिंजवडी आणि रस्ते ३. दिल्ली रेप केस ४. स्वर पण डमरू चे - द डमरू फेस्टिवल आता सगळ्यात लाटेस्त आहे ते म्हणजे द डमरू फेस्टिवल, जो पुण्यात ह्या शनिवारी आणि रविवारी झाला ! सो मी लवकरच तुमच्या बरोबर ह्या कर्ण मधुर कार्यक्रमाची माहिती शेर करेन .. तो पर्यंत टाटा ..

Saturday, May 5, 2012

USA embassy - अनुभव

USA embassy समोर बसून काय कराव कळत नवत म्हणून म्हटलं थोड लिहाव काही तरी कनस्त्रक्टीव तरी होईल. मी माझ्या घाईमुळे आणि मुर्खापणा मुळे माझा कॅमेरा पुण्यातून निघताना घेतला नाही तो जर आणला असता तर आता मला जास्त काही विचार करायची वेळच लागली नसती कारण इथे प्रत्येक गोष्ट कॅमेरा ्मधे बंद करण्याची होती, मागेच समुद्र होता तिथे हि मला फोटो काढता येवू शकले असते पण काही उपयोग नाही आता ..विचार करूनही ... मग विचार केला कि जर माझ्या लिहिण्यातून मी इथले चित्र जर वाचकासमोर आणू शकाले तर छान होईल. मी आता एका फळ वाल्याच्या शेजारी रचून ठेवलेल्या फळांच्या क्रेट वर बसली आहे आणि मस्त चहा पीत पीत हे लिहित आहे. माझ्या आजू बाजूला असंख्य लोक उभी आहेत, रस्त्याच्या इकडच्या तिकडच्या दोन्ही बाजूला लोकन्चि ये जा चालु आहे. embassy मध्ये जाणारी लोक म्हणजेच अप्लीकॅन्त अतिशय तणावातून रांगेत हळू हळू पुढे सरकत embassy मध्ये जात आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न .. माझे काय होईल ?, मला काय प्रश्न विचारतील ? त्यांची भाषा मला कळेल का ? सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मला विसा मिलेल का ? कोणी ओफिस कडून H1 वा L1 करण्यासाठी आलेले आहेत किवा कोणी आपल्या मुलीकडे व मुलाकडे जाण्यासाठी विसा करत आहेत, त्याचं एक वेगळच टेन्शन. नवीन लग्न झालेल्या मुलींचं वेगळाच टेन्शन .. त्या आपल्या भविष्य ठरण्यासाठी रांगेत उभ्या आहेत .. लग्न तर झालाय पण विसा होईल का आणि मी तिकडे जाऊ शकेन का ? अश्याच काहीश्या भावना त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहेत. हि झाली आत जाणाऱ्या लोकांची परीस्तीती .. आता बाहेर कोणाचे आई बाबा आपल्या मुलाचे काम होईल कि नाही हि चिंता करत उभे आहेत, कोणाचा भाऊ , कोणाचा नवरा, कोणाची बहिण, काका, मामा अशी असंख्य लोक embassy बाहेर जागा मिळेल तिथे बसून आपल्या माणसाची वाट पाहत आहेत .. कित्येक लोक स्वताला सोफास्तीकॅतेड किवा लई भारी समजणारी मस्त फुटपाथवर बसलेले इथे तुम्हाला दिसतील म्हणजे तसं मी हि इथे अशीच बसलेय. तेवढ्यात माझ लक्ष इथून चालत असलेल्या मुलींच्या घोळक्यावर गेल त्या विसा साठी आलेल्या दिसत नवत्या कदाचित इथून जात असतील. माझ लक्ष गेल त्यांच्या outfit वर आणि accesaries वर. एकंदरीतच मुंबईत नवीन ट्रेंडस खूप लवकर येतात आणि नंतर त्या इतर सगळ्या शहरामध्ये पसरतात. मुंबईच्या मुली लगेचच ओळखू येतात, एकतर गोगल त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो मग त्यातही त्यांची फशन दिसते मग तो ब्रान्देड नसला तरी त्यांना चालतो. त्यांच्या कानामध्ये कानातल्यांचे प्रकार बघण्यासारखे असतात. बऱ्याच वेळेला केस सुटतेच दिसतील त्यांचे, जस काही त्या येणाऱ्या घामाची त्यांना सवय झालेली असते, कोणी वेणी घातलेली दिसते पण त्यातही वेरीअशांस असतात म्हणजे एकाच बाजूला ला वेणीचे पेड असतात तर दुसऱ्या बाजूला समोरच्या केसाची बट पुढे डोळ्यावर काढलेली असते. मला तर बऱ्याच वेळेला वाटत कि त्यांच्या डोळ्यांना त्या अश्या प्रकारच्या केसांचा त्रास तर त्रास होत नसेल का?. पण एवढ मात्र आहे त्याच आयुष्य खूप फास्ट आहे. जेवढ्या लवकर त्या नवीन गोष्टी अदाप्त करतात तेवढ्याच लवकर बदलतात हि. तेवढ्यातच मला embassy मधून एक मुलगा बाहेर येताना  दिसला  त्याच स्वप्न पूर्ण झालेलं त्याच्या चेहऱ्यावर लागेचाच  कळत होत, मस्त हसत हसत त्याने बाहेर पावूल  टाकत ते नवीन आयुष्याची निव रोवण्यासाठीच, मग माझ लक्ष मी पुन्हा एकदा embassy मधून बाहेर येणार्यांकडे केंद्रित केल एक छानस जोडप बाहेर पडल पूर्णत्वाचा भाव ठेवून, ठेवढ्यात एक मुलगा धावतच बाहेर आला आणि आपल्या मित्राला कि भावाला कडाडून मिठी मारली पण मागूनच एक मुलगा मान लटकावून बाहेर पडला नी पटकन दिसेनासा झाला त्याला मात्र पुन्हा ह्या सगळ्या दिव्यातून जायचं होत   काही लोक हसत हसत तर काही तोंडावर प्रश्नचिन्ह घेवून बाहेर पडत होते, प्रश्न तसा फारच साधा आहे असा वाटत पण त्याच उत्तर काय हे मात्र आपल नशिबाच ठरवत आणि usa विसा करताना नक्कीच ह्या सगळ्याचा अनुभव येतो. तुम्ही काय आणि कुठे कस बोलायचं, कस उत्तर द्यायचं हे कितीही ठरवून गेलात तरी ते तसाच घडेल हे मात्र सांगता येन अवघड आहे. ज्यावेळी मी विसा साठी गेले होते तेव्हा माझा विसा झाला होता त्या वेळेला पण तेव्हाही बऱ्याच लोकांनी बरीच इनपुट्स दिली होती कि सकाळचाच वेळ घ्या तर काम नक्की होत पण आता तर वेळ हि तुम्हाला ऑटो जनेरेतेड मिळते ..मग कोणी सांगितलं कि interviewer मुलगी असेल तर जरा अवघडच असत पण जेव्हा माझा विसा झला माझा interview एका मुलीनेच घेतला होता .. आणि मला एकदमच माझा तो दिवस आठवला जेव्हा मी हि अशीच घाबरलेल्या अवस्तेत विसा करण्यासाठी आले होते, मीही तेव्हा अप्प्लीकॅन्त्च्या लीने मध्ये उभी होते तेव्हा माझ बाहेरच्या लोकां कडे व बाहेर कुठेही लक्ष्य गेले नाही .. आज हि आठवत, स्वत जवळच्या सगळ्या गोष्टी अगदी मोबिले सुद्धा आपल्याला VFS च्या ऑफिस मध्ये लोकेर मध्ये ठेवून फक्त आपले लागणारे कागद पत्र (त्यांच्या दिलेल्या लिस्ट प्रमाणे ) घेवून विसा ऑफिस मध्ये जायचे असते. रांगेत आत गेल्या वर आपले अप्प्लीकॅतीओन चेक ह्वून एन्ट्री झाल्या वर ते आपल्याला एकदा चेक करतात कि आपण कागद पत्र शिवाय काही घेवून तर आलो नाहीये ना .. मग आपल्याला एक लाकूड आणि टोकन हातात दिल जात जे आपल्या बरोबर परत बाहेर पडे पर्यंत ठेवायचं असते त्या लाकडाच काय काम आहे ते काही कोणाला हि कळत नाही पण मला आस वाटत कि त्या मध्ये एखादी चीप असावी ज्यामुळे जर त्यांना आत मधील सगळ्या लोकांवर एकाच वेळेला नीट नजर (कॉम्पुटर वरून ) ठेवता येईल. मग पुढे जावून आपल्याला अंगठ्याचे आणि बोटांचे इम्प्रेशन द्यायचे असतात तेव्हा हातावर मेहेंदी खराब बोट म्हणजे स्कीन ला काही प्रोब्लेम असेल तर ते लोक इम्प्रेशन घेत नाहीत मग आपण एका मोठ्या हॉल मध्ये आपला नंबर येई पर्यंत बसायचं , समोर आपल्याला बरेच कौन्तर दिसतात काही भाषा स्पेसिफिक असतात म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही अथवा काळात नाही त्यांच्या साठी ट्रान्सलेतर असतत. मला अजूनही आठवत एक आजी ज्या पंढरपूर वरून आल्या होत्या विसा करण्या साठी त्यांचा मुला कडे जायचं होत. अश्या मस्त नवावरी साडी घालून गळ्यात पंढरपूरच्या तीपिकॅल maala घालून त्या बसल्या होत्या जस मी त्याच्या शेजारी जावून बसले त्यांनी मला विचारलं बघ काय बाय हा नंबर आलं का ? मला त्यांचा कॉन्फिदान्चे पाहून अजूनच हुरूप आला .. मग जसा माझा नंबर आला मी त्या दिशेने गेले आणि इंटरविव चालू झाला आणि संपला पण .. फक्त २ प्रश्न आणि विसा मिळाला ..मला विसा मिळाला .. मला विश्वास च बसत नवता .. त्यामुळे काहीही खोट बोलायचा प्रयत्न करू नका खोते कागदपत्र लावू नका, कागदपत्र नित लावून त्याच्या समोर प्रेसेंत करा आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आपली body language खूप लक्ष्य पूर्वक त्याचं आपल्या कडे लक्ष्य असत ते मात्र अजिबात विसारु नका .. पण आपण अजिबात कुठल्याच गोष्टीवर ठाम पणे सांगू शकत नाही कि असाच असेल वा असाच होईल .. शेवटी तुम्ही काय कस करता ह्या पेक्षा तुमच्या नशिबाने काय ठरवलं आहे तेच जास्त महत्त्वाचे ठरते .

Friday, March 16, 2012

एक छोटासा अनुभव .... मन टवटवीत करणारा !!

बऱ्याच दिवसात काही लिहीयला वेळ मिळाला नाही म्हटलं एक छोटासा अनुभव सांगावा ...

गेल पूर्ण एक वर्ष मी माझी कार तशीच चालवत आहे म्हणजे माझ्या कडे लर्निग लायसन्स आहे पण परमनन्त काढायला मला वेळच मिळत नवता. शेवटी मागच्या आठवड्यात वेळ काढून गेले आळंदीला त्या ऑफिस मध्ये , लगेचच काम झाल आणि मला जाम भूक लागली होती म्हनून मी पुढे फिनिक्स मॉंल मध्ये जायचं ठरवले . बरेसचे मित्र तिथेच जवळच काम करत असल्यामुळे मी सगळ्यांना फोन करून बोलावून घेतल . सगळ ठरल्यावर मी लायसन्स च्या ऑफिस मधून निघाले आणि थेट नगर रोड ला जाऊ लागले तेवढ्यातच एका डाव्या वळणावर माझ्या कडून गाडीला जोरात ब्रेक लागला नी माझा मोबाईल माझ्या मांडीवरुन खाली पडला कारण गाडी चालवताना मोबाईल मी नेहेमी मांडीवर ठेवते, म्हणून मी गाडी थोडी बाजूला घेतली आणि सीट बेल्ट काढला फोन उचलला आणि बेल्ट लावायचा विसरले आणि तशीच पुढे गेले , लगेचच पुढे रस्ता नगर रोडला जावून मिळत होता .
तिथे होता मामा , नेमेक ( माझ वाईट नशीब ) मला पाहिलं आणि पाहिलं कि माझा सीट बेल्ट लावला गेला नाहीये. मग काय गाडी बाजूला घ्या म्हणून मला त्याने खूण केली आणि मी घेतली. पाहिलं मी त्याला गाडीतूनच सांगण्याचा प्रयन्त करत होते कारण बाहेर अतिशय घाण उन होत पण त्याच लक्ष दुसऱ्या मुलाकडे होत ज्याला त्याने माझ्या आधी पकडल होत सिग्नल तोडल्या मुळे .. मग मीच गाडीतून खाली उतरले आणि त्याच्या गाडी जवळ गेले . त्या मुलाच काम झाल्यावर आणि त्याच्या कडून पैसे घेतल्यावर त्यांनी त्याच लक्ष माझ्यावर वळवल , काही न बोलता रिसीट बुक वर लिहायला त्याने सुरुवात केली. लायसन्स दाखवा .. मी दाखवलं , मग विचारलं नाव काय आहे ... नाव सांगितलं मग विचारलं कुठे राहता .. ते पण सांगितलं .. तो पर्यंत मी माझ्या डोळ्यांवरचा गोगल डोक्यावर लावला आणि त्याला बोलले , काका .. मी इथेच बेल्ट काढला होता माझा मोबाईल पडला म्हणून मी तशी गाडी कधीच नाही चालवत आणि माझी दुसरी गाडी तर बेल्ट लावला नाही तर बीप वाजवत राहते ..त्यामुळे मला बेल्ट लावूनच गाडी चालवायची सवय आहे ...
तेव्हा त्यांनी माझ्या कडे नीट दोनदा पाहिलं आणि तो बोलला , बाई .. तुम्ही कुठल्या मराठी सीरीअल मध्ये आहात का ? मला कळलाच नाही मी म्हटलं काय ? त्यांनी पुन्हा विचारलं मी बोलले हो मी असते सिरिअल मध्ये ...
लगेचच त्याचा बोलण्याचा स्वर बदलला .. मि त्याला सॉरी बोलण्या ऐवजी तोच मला सॉरी बोलायला लागला .. सॉरी, मादाम हा मी ओळखल नाही ..इथे कुठे काम काढलात .. एवढ्या लाबं ? मी सांगितलं कि माझ काही काम होत आणि आता मी फिनिक्स मॉंल ला जातेय माझे काही मित्र माझे वाट पाहत आहेत .. मी म्हटलं किती पैसे झाले सांगा मला मोकळ करा .. मग काय तो बोलला .. मी नसते घेतले पैसे हो पण मी रिसीट तयार केलेय .. तुम्ही एक काम करा ५० द्या फक्त .. सॉरी हा मादाम ... मी म्हटलं ..ठीक आहे काहीच हरकत नाही मी रुल तोडलाय देते पैसे ... आणि मी तिथून निघाले ..निघताना पण त्याने अगदी छान हसत मला अच्छा केला ...
पुढे गेल्यावर हा अनुभव मी माझ्या मित्र मैत्रीण सांगितला, घरी सांगितला ..सगळे खूप खूप पोट धरून हसलो माहित नाही त्या पोलिसाला मी कोण मराठी कलाकार वाटले ते ... पण छान वाटला तो अनुभव !

Friday, February 17, 2012

माझ नवीन फोटोग्राफी पेज ...

माझ नवीन फोटोग्राफी पेज , कृपया खालील लिंक वर क्लीक करा आणि आवडलं तर नक्की पुढे शेअर करा -

http://www.facebook.com/pg0511


- तुमची प्रीती

Thursday, February 16, 2012

Please VOTE today ...



I voted ... YOU ??

Please Vote today ..if not then please dont complain about the system ..


Saturday, February 11, 2012

युवी...वि आर मिसिंग यु !!


युवी ..युवराज .. क्रिकेट वर राज करणारा तो युवराज .. भारताचा नायक .. क्रिकेट साठी लढणारा लाढविय्या एकदम अचानक पटागांतून दिसेनासा झाला .. आणि लढू लागला आयुष्याची लढाई ..
खूप वाईट वाटले जेव्हा युवीच्या आजार बद्दल कळले आणि एकदम आठवली ती जाहिरात "जब तक बल्ला है थाट है .. नही तो ?"
जेव्हा पाहिल्यांदा त्याच्या आजार बद्दल पपेर मध्ये कळले तेव्हा कुठे तरी पाल चुक्चुकून गेली कि नक्की काय आहे ..पण काही दिवसातच बातमी आली आणि मन अस्तीर झाल ..
मनुष्याच जीवन इतक नाजूक रेशमी धागा असतो का ? .. कि तो कधी हि विरू लागतो आणि आयुष्याची लढाई चालू करून देतो, हि गोष्ट कोणीच सांगू शकत नाही .. युवी ची बातमी कळल्यावर माझ्या डोळ्या समोर त्याचे सगळे चांगले दिवस एका मागून एक येवून गेले .. त्याची प्रेमप्रकरणे , त्याचे ते एकाच ओवर मधले ६ षटकार .. आणि त्याला मिळालेली वाह वाह .. त्याचे चित्रपट ताराकाबरोबराचे नाच .. त्याच्या सगळ्या जाहिराती आणि मग ... तो विश्व विजेता होण्याचा मान आणि जगलेल ते स्वप्न .. सगळ्यांचच ! जे पूर्ण करण्यामध्ये त्याचा फारच मोलाचा वाटा आहे. विश्वजेत्ते पद मिळाल्या नन्तर त्यांनी व्यक्त केलेला आनंद उत्सव ... शब्द नाहीयेत त्या गोष्टी सांगण्यासाठी .. आणि आपण सगळ्यांनीच ते पाहिलंय आणि अनुभवलाय !
काळ कसा एका शक्नात बदलतो आणि होत्याच नवत करतो .. युवीच्या सगळ्या जाहिराती आता कोणी तरी वेगळे लोक करत आहेत फक्त एकच जाहिरात अजूनही तशीच आहे एका बदला सह .. "जब तक बल्ला है थाट है .. नही तो , जिंदगी भी क्या रंग दिखती है .."
युवी लवकरच छान बर होऊन पटागांत परत येईल आणि त्याच्या त्याच कातील खेळातून पुन्हा आपल्या देशाच नाव पुढे आणील असाच मला मनापासून वाटत आणि मला वाटत असाच सगळ्यांना हि वाटत असेल ..
युवी वि मिस यु !!

Sunday, January 29, 2012

अहम अहम .. भेटा माझ्यातल्या लेखक आणि फोटोग्राफर ला .."महाराष्ट्र टाइम्स" मध्ये !!

मला सांगण्यात खुपच आनंद होतोय कि माझा एक लेख कवडीपाट आणि त्याचेच काही फोटो , २८ जानेवारी च्या "महाराष्ट्र टाइम्स" मध्ये छापून आलाय.
२८ जानेवारीच्या सकाळी ७:०० च्या दरम्यान मला आनंदाचा धक्का मिळाला जेव्हा मला मझ्या काही जवळच्या लोकांचा फोन आला आणि मला कळल कि माझा लेख आजच्या पेपर मध्ये छापून आलाय .. मी तडक उठले आणि पेपर पहिला ... छान वाटल स्वताच नाव एवढ्या मोठ्या पेपर मध्ये वाचून ... दिवसभर बऱ्याच लोकांनी फोन करून अभिनंदन केल त्याच अप्रूप काही वेगळच नाही का ?



टीप -पूर्ण लेख नीट वाचण्यासाठी , वरच्या फोटोवर क्लीक करा.
किवा फोटो दुसऱ्या विंडो मध्ये उघडा आणि झूम करा.

Friday, January 20, 2012

माझीच मी ...


परडी भरली होती फुलांनी
ओसंडून वाहिली होती चारहि दिशांनी
वाहून गेले माझीच मी ...
अश्रू वाहोनि थिजले गाली
विरघळून गेली ती कहाणी
अस्मिता जपली माझीच मी ...
चान्दण झेललं ह्या ओठी
सुख साठवलं ह्या पोटी
ओंजळीत लपली माझीच मी ...
चालत चालत चालले मी
पुन्हा नं मागे पाहिलं मी
ओळखीच्या वळणवर, ना
नदीच्या काठावर, ना
संध्येच्या सूर्य बरोबर
चालत चालली माझीच मी ...

Saturday, January 14, 2012

भाव साजिरे दे ना मला .....


मोर पीस जणू फिरून गेल

घाव सारे वाहोनि नेले

भाव सारे देवोनी गेल

आनंदाच्या गगनात

फुलाच्या वनात

मोर पिसारयत ये ना पुन्हा

भाव साजिरे दे ना मला .....

Wednesday, January 4, 2012

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व ... जे शिकवून गेल बराच काही !!! अलविदा २०११ ...



मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत होत पण अचानकच वादळ आल आणि सगळ काही धुसर झाल आणि वाटच चुकली वाट अशी चुकली कि परत वाटेवर न आणता पूर्वीच्या वाटेवर सोडून गेली, तेव्हा कदाचित हे नवते माहित कि पूर्वीचीच वाट बरोबर होती ..
२०११ वर्षाची सुरुवातच वादळाने झाल्या मुळे पूर्ण वर्ष त्या वादळाच्या पाऊल खुणा काढण्यात गेल्या आस काहीस म्हणायला काहीच हरकत नाहीये, आयुष्यात जे काही कठीण प्रसंग येऊ शकतात ते सगळे हा म्हणजे तसे सगळेच जवळ जवळ येवून गेल्या सारखे वाटले. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आयुष्यात प्रोब्लेम्स असतात.. हो तर , असतात नं पण प्रत्येकाने आपला एक साचा बनवलेला असतो आणि त्याच्या बाहेर माणूस जास्त करून जाण्याचा प्रयत्न करत नसावा बहुतेक ..
तसाच साचा बनवलेला होता पण ह्या वेळेला साच्यात ठरवलेल्या गोष्टी आल्याच नाहीत, ज्यांच्या वर जास्त विश्वास होता ती लोक विश्वासाच्या चौकडीत बसलीच नाही तिथेच नापास झाली आणि स्वतच जग बानवण्यासाठी दुसऱ्याच बनवलेलं जग निर्दयी पणे तोडून निघून गेली. जीवनात भावना किती महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा कोणी त्या तोडून मोडून लाथाडून निघून जात तेव्हा त्या इकडे तिकडे विखुरलेल्या भावना एकत्र गोळा करताना काय यातना होतात ते शब्दात सांगूनही कोणाला कळणार नाही. प्रत्येक भावना गोळा करताना मन किती जड होत हि गोष्ट अनुभवण्यासाठी त्याच अनुभवातून जाव लागेल. हे जग किती स्वार्थी असू शकत ते कळल्यावर आपला विश्वास कोणावरच बसू शकत नाही. प्रत्येक माणूस संशयी वाटू लागतो .. अगदी प्रत्येक !
त्यामुळे ह्या वर्षात हे कळल कि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये अगदी ती व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची का होऊ नये, अगदी कितीही.. काही गोष्टी शेऐर करतान हजार काय १० हजार वेळा विचार करा.
आणि प्रत्येक वेळेला स्वताचा विचार करा आपल कस कश्या मुळे जास्त फायदा होईल ते बघा , जग स्वार्थी आहे तर आपण पण काय कमी स्वार्थी आहोत असा प्रश्नच पुढे कधी येतच कामा नये ... हि झाली भावनिक शिकवण जी २०११ वर्षां कडून मिळाली .
मग आली आर्थिक, कितीही छान गुंतवणूक आहे असे वाटल तरी स्वता कडचे सगळे पैसे संपवून त्याच्या मागे पळने मुर्खपणा असतो, पैसे संपतात आणि जेव्हा खरच पैश्याची गरज असते तेव्हा जमीन किवा घर आपल्याला लगेच काहीच पैसे देवू शकत नाही .. गुंतवून करा पण पैसे थोडे बाजूला ठेवून करा कारण जस मी वर सांगितलं, तस कोणीही कितीही जवळच असाल तरी पैश्याची गोष्ट आल्यावर सगळे तू कोण असेच हात वर करतात .. अगदी फालातुतल्या फालतू रकमे साठी सुद्धा ! आणि कधी काळी जरी तुम्ही त्या लोकांना मदत केली असेल तर तो परत आपलाच मुर्ख पणा ...
मग होत कॅरीअर् बद्दलचे झटके, नवीन ऑफिस मध्ये स्वताला सेट कारण हे मला वाटत सगळ्यात अवघड काम असेल आणि जेव्हा तुमच्या कुठल्याच गोष्टी निट होत नाहीयेत हे जेव्हा तुम्हाला माहित असत तेव्हा
बाकीच्या गोष्टीही नक्कीच खराब होतात कारण तुमच मन आणि डोक दोनीही जागेवर नसतात. त्यामुळे जेव्हा तुमच सगळाच पणाला लागल असेल कॅरिअर पणाला लावणे हा एक मोठा मुर्खपणा ठरेल ..
आता साधी आणि सोपी गोष्ट सगळ गणित बिनसल आणि एकदा का गाडी रुळावरून घसरली कि सगळा पडसाद उमटतो घरामध्ये आणि घरातल्या लोकांवर आणि चालू होतात घातरले प्रोब्लेम्स जे सुटत तर नाहीच उलट बिघडतच जातात आणि खर तिथे तुम्हाला गरज असते समजुतीची आणि कोणी तरी समजावून घेण्याची जर कोणी तस केल तरच घरामध्ये जास्त खचण्या आधी आपण वर येतो ...
त्यातच आयुष्यात हे हि शिकले कि तुमच्या कडे सगळ असेल पैसा, हुद्दा , ताकद, सौदर्य आणि व्यक्तीमतत्व पण 1 वेळ तुमला सगळ विसायला लावते अगदी सगळ .. जास्त अभिमान तुम्हाला घेवून बुडतो.
एकंदरीतच, आयुष्याच गणित जर एकदा चुकल तर ते बरोबर उत्तर द्यायला खुप वेळ लागतो आणि बरोबर घेवून जातो पैसा, काळजी, भावना , लोक , वेळ आणि वृत्ती ...
तेव्हा २०११ ने बराच काही हिरावून गेल पण शिकवून गेल लाख मोलाच्या गोष्टी ज्या आता पर्यंतच्या आयुष्यातही शिकल्या गेल्या नवत्या. जुनी लोक बोलतात कि नेहेमी आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात ते आपल्याला काहीतरी धडा शिकवून जातात . आज कालची पिढी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसेल पण अश्या गोष्टींवर विश्वास बसण क्रमप्राप्त होत. २०११ वर्ष वाईट नवत ते होत नवीन धडे शिकवणारे वर्ष, जे धडे येणाऱ्या पुढील आयुष्यात नेहेमीच उपयोगी पडतील.
त्यातहि काही लोक सरप्राइस गिफ्ट पेंकेत मध्ये ह्या वर्षात आले आणि थोडा का होईना आपलेपणा आणि समजूतदार पण दाखवून गेले. आणि त्यामुळेच आलेल वादळ आणि त्यामुळे सापडलेली आधीची वाटच अगदी योग्य होती ह्याची पावती देवून गेले.

Tuesday, January 3, 2012

डॉन २


आज डॉन २ पाहिला , चित्रपटाला खुपच छान वेग आहे. आपण मनात काही विचार करण्याच्या आताच पुढची गोष्ट आपल्या समोर येते .. त्यामुळे चित्रपट पाहताना अजिबात कंटाळा येत नाही .. फरान ने खुपच छान कथानक जागवलय ..
चित्रपटाचा वेग आणि सगळे भारत बाहेरचे लोकेशन असल्या मुळे आपल्या कुठे तरी होलीवूड चित्रपट बघण्याचा भास होता आणि फरान ते आगदि ८० % जमल आहे .. ह्या चित्रपट मध्ये हि शेवट आपल्याला चक्रावून जातो जस डॉन १ मध्ये जातो.
बाकी सस्पेन्स छान घेतलाय .. चित्रपट गृहात जावून बघायला काहीच हरकत नाही. डॉन चे केस छान दिसतात नेहेमीच्या केसांपेक्षाही पण चेहेरा अर्रे बापरे त्यांनी आता वय झालेल्या लोकांचे रोल करावेत म्हणजे काका मामा वा वडील .., प्रियांका चोप्रा फारच साधी दिसलेय (gal next door) म्हंजे तशी ती काही छान नाहीच आहे पण मोठ्या पडद्या वर तरी ती चांगली दिसते ..पण डॉन २ ह्या साठी अपवाद ठरेल कारण बहुटेक तिच्या मेकउप कडे कोणी लक्ष्य दिलच नाहीये .. जास्त करून तीच नाक त्याला काहीच शेप च नाहीये मेकउप वाला बहुतेक विसरून गेला नाकाला रंगवायला ..
बर असो, सगळ्यात आचर्य मला वाटल ते म्हंजे प्रियांकाचा पोलीस मित्र अर्जुन .. म्हंजे छान वाटल मला त्याला त्या मोठ्या पडद्या वर पाहून कारण तो माझ्या गावाचा आहे .. लोक कशी छान पुढे जातात हे त्याच्या कडे पाहून कलात .. छोट्या गावातून एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसन आणि ते हि एवढ्या मोठ्या लोकांबरोबर .. खरच hatsoff to him ... !!
त्यामुळे चित्रपत तुम्ही पाहू शकता , अजिबात कंटाळा येत नाही ... फक्त डॉन च प्रियांका वरच प्रेम थोड पटत नाही .. गोष्टीला रुचत नाही ..